Saturday, October 26, 2019

अभिनंदन परागजी

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विले पार्ले विधानसभेचे आमदार म्हणून ऍड . पराग अळवणी  सलग दुसऱयांदा तब्बल ५८,९११ च्या मताधिक्याने निवडून आले. माझी भाजप कार्यकर्ता म्हणून तिसरी आणि स्वत: परागजी उमेदवार म्हणून असलेली ही पहिलीच निवडणूक . तशी माझी आणि परागजींची ओळख ५ वर्षेच जुनी . २०१४ सालातल्या डिसेंबर महिन्यातली ही गोष्ट असावी . तेंव्हा ते नुकतेच तेही पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले . ते राहात असलेल्या इमारतीच्या पार्किंग मध्ये आमची भेट झाली . त्यांचे कार्यालय सांभाळण्याची जबाबदारी मला मिळाली होती. वर्षभर मी त्यांचा कार्यालय प्रमुख म्हणून काम पाहिले .नंतर मी माझे स्वतंत्र काम सुरु केले,तरी परागजींबरोबर असलेला ऋणानुबंध अद्यापही तसाच आहे. परागजींच्या सहवासात मी अनेक गोष्टी शिकलो .त्याचा मला स्वतः चे व्यक्तिमत्व घडविण्यात खूप मदत झाली.परागजींच्या कार्यालयात काम करत असताना अनेक मित्र मिळाले. खूप मोठ्या लोकांचा सहवास लाभला. भाजपचा प्रभाग क्र. ८१ मधला कार्यकर्ता म्हणूनही परागजी एक सक्षम नेता आहेत याची ही प्रचिती आली .त्यामुळे जेंव्हा विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जेंव्हा निश्चित झाली तेंव्हा पुन्हा एकदा आपल्या नेत्याला जिंकून द्यायचेच या उद्देशाने विले पार्ले विधानसभेमधला परागजींचा प्रत्येक कार्यकर्ता भारून गेला होता. पण केवळ कार्यकर्ताच नव्हे तर विले पार्ले विधानसभेतील सामान्य नागरिकांवरही पराग अळवणी या माणसाचे गारुड आहे .परागजींनी आपल्या विधानसभेत केलेल्या कामांची यादीच सांगते की परागजींनीं आपल्या विधानसभेच्या उत्कर्षासाठी किती कष्ट घेतलेत ते. मग तो विमानपत्तन परिसरातील बाधित झोपड्पट्टीवासीयांबद्दल असो किंवा चकाला ,चरतसिंग वसाहत परिसरातील मलनिःस्सारण वाहिनीसंदर्भातील विषय असो असे अनेक विषय परागजींनी लावून धरले आणि त्यात यश मिळवले. त्यामुळे त्यांच्या विधानसभेतील लोकांचे आपल्या या सुसंस्कृत ,सुस्वभावी,विनयशील,हुशार आणि मेहनती नेत्यावर प्रचंड प्रेम आहे . त्यामुळे या वेळीही केवळ जिंकायचे नाही तर मोठ्या फरकाने जिंकायचे हा निर्धार करूनच भाजप कार्यकर्ते कामाला लागले होते. परागजी उमेदवारी अर्ज भरायला निघाले तेंव्हा भाजप कार्यकर्त्यांची गर्दी पाहून विरोधी उमेदवारांना नक्कीच धस्स झाले असेल. प्रचंड जनसमुदाय . परागजी तुम आज बढो हम तुम्हारे साथ हैं या नार्याने सारे पार्ले भरून गेले होते. अर्ज दाखल झाला आणि कार्यकर्त्यांची लगबग आपापल्या विभागात वाढू लागली. परागजी तर आपल्या विधानसभेत पायाला भिंगरी लागल्यागत फिरत होते .कार्यकर्त्यांबरोबर बैठकांच्या फेऱ्या होत होत्या . समाजमाध्यमे ,प्रचारपत्रकांच्या माध्यमातून प्रचार जोर पकडत होता .गेल्या खेपेला जिथे मतं कमी पडली त्या विभागात काम अधिक जोमाने सुरु होते,कमी मतं का पडली याविषयी त्या त्या विभागातले नेमलेले प्रभारी स्थानिक कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करीत होते .जिथे गरज पडली तिथे परागजी जातीने सभांना हजेरी लावत होते ,कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करत होते . बहुतेक कार्यकर्ते परागजींचा प्रचाराचा धडाका बघून असेही म्हणू लागले "अरे परागजी जिंकणारच आहेत खात्री आहे आम्हाला तरी परागजी एव्हढी धावपळ का करतायत ??" .शाळेतला हुशार विदयार्थी हा केवळ चांगले मार्क मिळाले म्हणून समाधानी नसतो त्याला पैकीच्या पैकी मार्क हवे असतात कारण त्याला चांगल्या मार्कांच्या सुखापेक्षा गेलेल्या मार्कांचे वाईट वाटते .परागजींचेही तसेच चांगली मतं आपल्याला मिळणार हे त्यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याला समजत नव्हते असे नाही ,पण विजयाला सोळा अणे बळकटी हवी.प्रत्येक बूथमधून भरघोस आघाडी मिळावी यासाठी परागजी आग्रही होते.त्यांचा हा ध्यासच कार्यकर्त्यांमध्ये जोश जागवीत होता म्हणूनच की काय निवडणुकांच्या काळात अनेक कार्यकर्ते कामावर रजा टाकून आपापल्या प्रभागात हिरीरीने प्रचार करत होते. माझ्या प्रभाग कर. ८१ बद्दल बोलायचे तर आमच्या प्रभारी शुभांगीताई भावे नुकत्याच एक आजारातून बऱ्या झालेल्या त्यांना विश्रांतीची नितांत आवश्यकता असतानासुद्धा सतत परागजींसाठी जीवाचे रान करत होत्या. निलेश सावंत,संतोष गोताड,लीना गोम्स ,बोनू,मनीषा पटेल,स्वाती मोरे,वयाची साठी उलटले डेविड काका,युसूफ मुल्ला ,संजय भेकरे,अनंत चव्हाण  आदि  मंडळी दिवस रात्र एक करत होती ,परागजींच्या सभा यशस्वी व्हाव्यात,त्यांचा प्रचार योग्य रीतीने व्हावा,प्रचार फेरीची मंजुरी ,त्या फेरीची आखणी,पत्रके वाटणे अशी भरमसाट कामे ही सर्व मंडळी जीवाचे रान करून पार पाडीत होती . 'LEADING FROM FRONT " या उक्तीला साजेश्या शुभांगी ताई स्वतः आपल्या तब्येतीची,बाकी सर्व चिंता,विवंचना बाजूला सारून परागजींचा भरघोस मतांनी विजय ह्या ध्यासाने भारून गेल्या होत्या. आपल्या प्रभागातून जास्तीतजास्त मते परागजींना मिळवून देणारच हे आव्हान ताईंनी स्वीकारले होते (आणि ते त्यांनी खरे करून दाखविले ,ज्या इस्लामपूरा विभागातून नेहमी काँग्रेसला मतदान होई त्या इस्लामपूरातील एकगठ्ठा मते परागजींना मिळाली ).अनंत अडचणी येत होत्या. कधी कधी स्थानिकांकडून विरोधाचा सूर येई पण त्या सर्व अडथळ्यांना  यशस्वी रित्या पार करत भाजप कार्यकर्ते नेटाने आपले काम करत राहिले. (इथे मला खारचे माजी नगरसेवक आणि जिल्हा महामंत्री महेश पारकर यांचा खास उल्लेख करावा लागेल कारण शुभांगी ताईला पहाडासारखी साथ महेशजींनी दिली.   ताईचा कामाचा ताण हलका केला) अनेकांना कौतुक वाटावे असे हे वातावरण बर्याच वरिष्ठ कार्यकर्त्यांना अगदी माझ्यासारख्या नगण्य कार्यकर्त्यालासुद्धा लोक भेटले की विचारायचे का एव्हढे का राबताय तुमच्या नेत्यासाठी,काय मिळणार आहे तुम्हाला?? याचे कारण आमचा सर्वांची काळजी करणारा आमचा नेता हे होय. मला या निवडणूकीदरम्यान आलेले दोन अनुभव पुरेसे बोलके आहेत.प्रचारफेरी होती आणि वेळ दुपारची,ऑक्टोबरचा तो सर्वात गर्मीवाला दिवस होता,वातावरणातला दमटपणा अजूनच थकावट आणत होता.यात्रेत कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. परागजी प्रचाररथावर स्वार झाले फेरी सुरु होताच काही वेळाने मी रथाजवळच उभा असल्याने त्यांनी मला विचारले अमित हा फेरीचा मार्ग खूप लांबचा नाही ना ?? सकाळी एक प्रचारफेरी आटपून आलेले परागजी थकले असावेत असा माझा कयास पण त्यांचे पुढचे वाक्य त्यांच्यातल्या काळजी करणाऱ्या नेत्याचे दर्शन देणारे होते. माझ्या मनातला प्रश्न आपल्या चाणाक्ष नजरेने ओळखत परागजी म्हणाले अमित मला माझी पर्वा नाही मी उमेदवार आहे पण या वातावरणाचा  त्रास माझ्या कार्यकर्त्यांना झालेला मला चालणार नाही. मी स्तब्ध झालो. रात्री उशिरापर्येंत कार्यकर्त्यांच्या बैठकीत असेलेला आणि तरीही सकाळी एक प्रचार फेरी आटपून आलेला आणि पुन्हा एकदा प्रचार फेरीला सज्ज असलेला हा नेता आपल्या आधी आपल्या कार्यकर्त्यांचा विचार करतो. फेरीच्या आधी फेरीच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था झाली आहे की नाही ते स्वतः जातीने बघणारा हा संवेदनशील नेता . खरंच कौतुकास्पद. दुसरा प्रसंग एक स्थानिक परागजींकडे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची तक्रार करत होता. पण परागजींनी आपल्या नेहमीच्या शैलीत त्या माणसाची हजेरी घेतली आणि हे कार्यकर्ते मला निःस्वार्थी साथ देतात ह्यांच्याबद्दल एक शब्द ऐकून घेणार नाही अशी ताकीद दिली. अशा नेत्यासाठी कार्यकर्ते धडपडतात त्यात आश्चर्य ते काय!! या माणसाकडे प्रचंड ऊर्जा आहे. एव्हढा मोठा विले पार्ले विधानसभा प्रभाग परागजींनी अक्षरश: पिंजून काढला होता . अनेक बैठका ,निवडणुकीची इतर कामे,सततचा प्रवास पण परागजींच्या चेहर्यावर थकावटीचे एक ही लक्षण नसायचे त्यांचा हाच उत्साह ,कामाप्रती असेलेली निष्ठा कार्यकर्त्यांना बळ देत होती. अखेर तो २१ तारखेचा मतदानाचा दिवस उजाडला इतके दिवस ह्या दिवसासाठी केलेली तयारी,रात्रंदिवस घेतलेली मेहनत ,प्रचंड मेहनतीने जमवलेला लोकसम्पर्क यांचे मतांमध्ये रूपांतर करण्यासाठी कार्यकर्ते आपापल्या बूथमध्ये सज्ज होते. मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला प्रतिसाद कमी वाटत होता. कार्यकर्ते सावध झाले ,आपापल्या प्रभागातील इमारतींमध्ये,चाळीत राहणाऱ्या मतदाराला घरोघरी जाऊन आवाहन करू लागले. मतदानासाठी प्रवृत्त करू लागले . त्यांच्या प्रयत्नाला यश येऊ लागले. अनेक ठिकाणी मतदारांना ने आण  करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले आणि एक चांगल्या संख्येचे मतदान झाले. संध्याकाळी मतदान झाल्यावर भाजप कार्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती ती ही नाही की परागजी किती मताधिक्याने जिंकणार कारण  एकतर्फी लढत सरळ दिसत होती. दि . २४ ऑक्टोबर वेळ दुपारी १ वाजता पारंगजींचे मताधिक्य ४०,०००चा आकडा पार करून गेले होते. विजय निश्चित होता आता फक्त घोषणेची औपचारिकता बाकी होती. जिल्हा कार्यालयात प्रोजेक्टर स्क्रीन वर महाराष्ट्र निवडणुकीचे निकाल दाखवले जात होते कार्यकर्त्यांची खूप गर्दी होती. सर्वाना प्रतीक्षा होती परागजींची. विजय निश्चित झाल्याने मी समाधानाने घरी परतलो.थोडा आराम करावा म्हणून जरासा लवंडलो तर कधी डोळा लागला कळलेच  नाही .बऱ्याच दिवसानी शांत झोप मिळाली. जागा झालो तर समाजमाध्यमांवर परागजींची हसरी छबी सर्वांचे आभार पुष्पगुछरूपात स्वीकारताना झळकली. मनात म्हटले आपणही जावे आणि त्यांना भेटून यावे.इतक्या दिवसांच्या धावपळीने श्रमलेले परागजी असतील का कार्यालयात ? मनात संशय डोकावला .तडक परागजींचे स्वीय सहाय्यक आणि माझे परममित्र दीपक कदम यांना फोन केला ."सर आजून कार्यालयात आहेत ,कधी ही निघतील ,लवकर ये " दीपक जी वदले .,धावत पळत जिल्हा कार्यालय गाठले .परागजी आपल्या कक्षात होते . पुष्पगुच्छांनी कार्यालय भरून गेले होते . सर्वानाच परागजींना  भेटायचे होते त्यांच्याबरोबर फोटो काढायचे होते ,सकाळी ७ वाजता मतमोजणी कार्यालय गाठलेले आणि संध्याकाळी विजय यात्रा करून आलेले परागजी कोणालाही नाराज करत नव्हते .सर्वांबरोबर फोटो काढत होते सुहास्य वदनाने सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत होते . थकवटीचा हलकासा परिणाम दिसत नव्हता . माझा नंबर आल्यावर मी पुढे झालो. "अमित ये ये " अशी आपुलकीची हाक ऐकू आली मी हस्तांदोलन केले मलाही फोटो हवा होता,त्यांच्या बाजूला फोटोसाठी उभा राहिलो. घाईगडबडीत मी त्यांच्यासाठी पुष्पगुच्छ आणायला विसरलो हे लक्षात आले मी ओशाळवाणा झालो ..माझी अवस्था माझ्या नेत्याच्या लक्षात आला आणि आपल्या या कार्यकर्त्यांच्या  फोटोचा विचका होऊ नये या साठी समोरच असलेला एक सुंदर पुष्पगुच्छ माझ्या हातात देत मिस्किलपणे म्हणाले "हं आता काढा रे फोटो, आमचा फोटो चांगला आला पाहिजे " . फोटो झाला मी पुन्हा एकदा हस्तांदोलन केले,आणि बाहेर जाण्यासाठी वळलो ,बाहेर खूप माणसे अभिनंदन करण्यासाठी ताटकळली होती .मला खात्री होती परागजी एकालाही नाराज करणार नव्हते .लोकांच्या गराड्यात सर्वांच्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करत सुहास्यवदनाने उभा असलेला आमचा सेनापती मनात साठवत मी बाहेर पडलो. आता पुन्हा सज्ज व्हायचे होते पुन्हा एक नवी सुरुवात झाली होती . लोकसेवेचा वसा घातलेला आमचा सेनापती आता थोड्याश्या विश्रांतीनंतर पुन्हा लढाईला सज्ज होईल म्हणजे आम्हालाही त्याला साथ द्यायला सज्ज रहावेच लागेल....."परागजी आप आगे बढो हम हमेशा तुम्हारे साथ हैं ". परागजी सलग दुसऱयांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन