Sunday, April 4, 2021

एकमेकांचे व्हा कायमचे!!!

ह्या दोघांची छोट्या पडद्यावरची chemistry अफलातून होती.परवा एका पुरस्कार सोहळ्यासाठी दोघे एकत्र अवतरले.खरे तर त्यांची अतिशय गाजलेली मालिका केंव्हाच संपली होती.या सोहळ्यात तर त्यांना नामांकनही नव्हते.पण सर्व आलेल्या आमंत्रितांपेक्षा हे दोघेच जास्ती "छाये हूवे" थे.
social media वर तर ह्यांच्या ह्या नव्या look ची, त्यांच्या एकत्र असण्याची बेफाट चर्चा चालू होती कारण होते तिने आपल्या Instagram account वर share केलेला त्या दोघांचा एक video.या सोहळ्यादरम्यान झालेल्या मुलाखतीत दोघेही एकमेकांबद्दल,त्यांना या मालिकेनिमित्ताने आलेल्या अनुभवांबद्दल भरभरून बोलले.दोघांच्या मैत्रीबद्दल विचारले असता त्याने त्याच्या नेहमीच्या सरळ आणि रांगड़या स्वभावाला अनुसरून "ही मैत्री आयुष्यभर अशीच राहील" असे सांगून टाकले.तिनेही सावधपणे का होईना पण त्याला हसत हसत "मम" म्हटले.पण तिनेच आपल्या"Instagram"वरच्या एका चित्राला दिलेल्या caption चाच वापर करून म्हणायचे तर "मुस्कुराते चेहरे,राज गेहेरे".
ही मालिका आता काही दिवसांपूर्वी मी पुन्हा एकदा ZEE5 APPवर बघितली.सलग नाही; पण "राणा-अंजली"चे काही निवडक प्रसंग म्हणा, एखादा Track आवडला म्हणून बघितला असे झाले. "दैनंदिन मालिका म्हणजे सिताफळ खाण्यासारखे असते. किती ही सांभाळून खायचे म्हटले तरी बरबट ही होतेच"- इति महान नट ॠषिकेश जोशी.
ह्या मालिकेचीही बरबट तर झालीच पण ही मालिका खूपच लोकप्रियही झाली.हे दोघे तर एव्हढे आपल्या भूमिकांमध्ये विरघळून गेले होते;जणू काही ही भूमिका त्यांच्यासाठीच लिहिली होती.पुढे पुढे तर हे दोघे अभिनय करतायत की खरंच एकमेकांच्या प्रेमात आहेत असे वाटावे इतकं या दोघांचे tunning जमलेले वाटत होते.दोघांची व्यक्तिमत्वेही त्या भूमिकेला पूरक होती.अगदी आदर्श जोडपे वाटावे अशी.त्यामुळेच की काय या दोघांनी वैयक्तिक आयुष्यातही एकमेकांची साथ द्यावी असेच या दोघांवर प्रेम करणाऱ्या त्यांच्या चाहत्यांना वाटले तर त्यात नवल ते काय?? आपण प्रेक्षक खूपच भाबडे असतो.नको नको म्हणत असताना पण एखाद्या मालिकेमध्ये, त्या व्यक्तिरेखांमध्ये गुंतत जातो मग हे असे होते.पण सगळेच प्रेक्षक काय भाबडे नसतात त्याना या व्यक्तिरेखांच्या अभिनयापलीकडचेही काही दिसत असतं.कारण दैनंदिन मालिकेमध्ये अशा अनेक जोड्या असतात. हजार हजार भाग करतात पण त्यांच्यामधले tunning, त्यांच्यामधली chemishtry पडद्यावर औषधालाही आढळून येत नाही. केवळ एखाद्याच्या बाबतीतच असे होते आणि त्यांच्याबाबतीत जेंव्हा प्रेक्षक असे म्हणू लागतात की या दोघांनी वैयक्तिक आयुष्यातही असेच एकत्र रहावे ही या जोडीवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांची नैसर्गिक प्रतिक्रिया असते.
अर्थात हे दोघेही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्याबद्दल निर्णय घेणारे आपण कोण??? पण हे दोघे एकमेकांना शोभतात, पुरक वाटतात एवढे मात्र नक्की.
एक भाबडा प्रेक्षक म्हणून एवढे मात्र वाटते या दोघांनी त्यांच्या पडद्यामागील वैय्यक्तीक आयुष्यातही सदैव एकत्र राहावे....कायमचे...
#RanaDaAnjaliBaai
#HardeekAkshaya
#togetherforever
#BestCoupleInWorld