झाडावरून ओघळणाऱ्या फुलासम
माझा अंतिम क्षण असावा
हे जग सोडून जात असताना
कसलाही आवाज न व्हावा
अमित अशोक परब
माझा अंतिम क्षण असावा
हे जग सोडून जात असताना
कसलाही आवाज न व्हावा
अमित अशोक परब
सध्या पितृपंधरवडा चालू आहे आणि माझ्या वडिलांचा आज दिवस आहे. त्यानिमित्ताने सुचलेली ही चारोळी.👆
माझ्या वडिलांची शिकवण,त्यांचं प्रेम आणि इतरही अनेक
त्यांच्या चांगल्या गोष्टी जश्या आयुष्यभर माझ्या लक्षात राहतील तसाच कायम स्मरणात राहील त्यांचा अंतिम क्षण!!!! कारण तो झाडावरून ओघळणाऱ्या फुलासारखा होता.
झाडावरून जेव्हा एखादं फुल ओघळतं तेव्हा त्याचा कसलाही आवाज होत नाही आणि त्यामुळे ते ओघळल्याचे समजतही नाही.तसंच काहीसं झालं.
पप्पांना सुपारीच्या खांडाचेही व्यसन नव्हतं.तरुण वयात अंगमेहनतीची काम केल्यामुळे आणि व्यायामाची मुळातच आवड असल्यामुळे वयाची साठी ओलांडल्यानंतरही त्यांची प्रकृती वर्धिष्णू होती. पण २४ मे २०१८चा तो दिवस आणि तो क्षण चुकला नाही.कसल्याही मोठ्या आजारपणाचा सामना करावा लागला नाही वा अंथरुणात पडून राहावं लागलं नाही.स्वतःला आणि दुसऱ्यालाही नकोसं असणारे म्हातारपण त्यांच्या नशिबात आलं नाही.शांतपणे झोपेतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.असा अंतिम क्षण ज्याच्या नशिबात त्याला पुण्यवान माणूस असं म्हणतात.आज हे सगळे विचार मनात डोकावत असताना क्षणभर वाटून गेलं माझ्याही नशिबात असा अंतिम क्षण असेल काय?बहुदा नसावा!! कारण तेवढं पुण्यही गाठीशी असावं लागतं.........😔
पप्पांना सुपारीच्या खांडाचेही व्यसन नव्हतं.तरुण वयात अंगमेहनतीची काम केल्यामुळे आणि व्यायामाची मुळातच आवड असल्यामुळे वयाची साठी ओलांडल्यानंतरही त्यांची प्रकृती वर्धिष्णू होती. पण २४ मे २०१८चा तो दिवस आणि तो क्षण चुकला नाही.कसल्याही मोठ्या आजारपणाचा सामना करावा लागला नाही वा अंथरुणात पडून राहावं लागलं नाही.स्वतःला आणि दुसऱ्यालाही नकोसं असणारे म्हातारपण त्यांच्या नशिबात आलं नाही.शांतपणे झोपेतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.असा अंतिम क्षण ज्याच्या नशिबात त्याला पुण्यवान माणूस असं म्हणतात.आज हे सगळे विचार मनात डोकावत असताना क्षणभर वाटून गेलं माझ्याही नशिबात असा अंतिम क्षण असेल काय?बहुदा नसावा!! कारण तेवढं पुण्यही गाठीशी असावं लागतं.........😔