Tuesday, April 10, 2018

गाऱ्हाणं........



हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा  म्हाराजा....व्हय म्हाराजा.....काही दिवसांपुर्वीची गोष्ट हा रे म्हाराजा..... झी मराठीवरली मालवणी भाषेची मालिकेतलो एक नट माका भेटलेलो.... मी त्याका विचारलंय का रे बाबा मालवणी भाषेवरची हि मालिका बंद कित्याक केलास..... त्यावर तो म्हणालो त्यो चॅनेल चो निर्णय आसा म्हणून..... मग त्यावर तो बोललो कि मालवणी माणसांबरोबर आणि मालवणी भाषेबरोबर नेहमी असाच होता... आणि माझ्या डोक्यात किडो वळवळलो.....खराच आसा ता ......अगदी कोकणात खयपण गावणाऱ्या आंबटगोड चवीच्या करवंदासारखी आपली मालवणी भाषा. पण तिचो आता ऱ्हास होवून लागलो हा.... सिनेमातून,मालिकातून,नाटकातून विनोदी पात्राच्या तोंडातून हि भाषा डोकावता...... पण दोस्तहो माझी मालवणी भाषा खरंच महान आसा कोकणात पिकणाऱ्या हापूस आंब्यासारखी कानाक गोड लागणारी,कोकणातल्या नद्यांसारखी तिरकस वळणांची आणि कितीही संकटांका पुरून उरलेल्या आणि कधीही आत्महत्येचो मार्ग न धरलेल्या कोकणी शेतकऱ्यासारखी कडक आसा माझी मालवणी भाषा. "वस्त्रहरण"वाले गंगाराम गवाणकर,मालवणी नटसम्राट मश्च्छिन्द्र कांबळी ,दिगंबर नाईक अशा अनेकांनी हाय भाषेचा महत्व टिकवून  ठेवलेला आसा पण माका वाटता कोकणात तर हि भाषा बोलली जाताच पण शहरात रवणाऱ्या आपल्यासारख्या लोकांची पण हि जबाबदारी आसा की आपल्या भाषेचो मान आणि अभिमान आपणांकच टिकवूचो लागतालो दोन गुजराथी म्हणा किंवा मद्रासी,केरळी,पंजाबी माणसा समोरासमोर असली कि हटकून आपल्या भाषेत बोलतत पण मालवणी माणसा नाय बोलत... ती बोलूक व्हयी.. आपल्या ह्या भाषेचो गोडवो आपणच सर्वांका दाखवून देवूचो लागतलो.... आपल्या पुढच्या पिढीक ह्यो भाषेचो वारसो देऊची जवाबदारी आपलीच आसा नायतर आपली पुढची पिढी ही भाषा बोलुनी नाय आणि मालवणी भाषा नामशेष होवूक वेळ लागायचो नाय. आधीच कोकणात गुजराती ,मारवाड्यान आणि इतर अनेक परप्रांतियान हातपाय पसरलेले आसत आपली भाषाही सहज बोलतत,पण आपापसात बोलताना आप्ल्याच भाषेत बोलतत;मग आपण कीत्या मागे रवायचा???कोकणावर,त्याच्या भाषेवर आपला मनापासून प्रेम आसात तर ह्यो  अक्षयतृतीयेचो मुहूर्त चांगलो आसा रे म्हाराजा..... या मुहूर्तावर मी तुका गाऱ्हाणा घालतंय कि आपल्या शहराकडल्या मालवणी माणसांका मालवणीतून बोलण्याची बुद्धी लाभू दे रे म्हाराजा.... मी तुका सांगताय रे म्हाराजा कि मी माझ्या आवशीबापाशीवांगडा ,माझ्या नातलगांवांगडा ,माझ्या बायले वांगडा मालवणीतूनच बोलतलय.आणि माझी तुमका सर्वांक विनंती आसा शक्य असतात तेंव्हा मालवणीतून बोलत रवा;चुकलात तरी चालात...चला आज संकल्प करूयात.आपण मालवणीतूनच बोलतलव कोणाची फिकीर न करता .... बोला व्हय म्हाराजा. 

No comments:

Post a Comment