Sunday, July 26, 2020

मित्रा फसवलेस....

जगातील सर्वात दुख:द घटना कुठली असावी तर एखादा आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्याला श्रद्धांजली द्यावी लागते तो.आज तो क्षण माझ्या आयुष्यात आलाय!! माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या माझ्या एका जवळच्या मित्राला मला श्रद्धांजली द्यावी लागेतेय. हा क्षण कधी येऊच नये असं वाटलं होतं पण काळापुढे कोणाचं चालत नाही.काळच सर्वांना वेदना देतो आणि आणि त्या वेदनेवर फुंकर ही काळच घालत असतो. आमच्या भाजप (विलेपार्ले) परिवारातले महत्त्वाचे सदस्य माननीय श्री अभिषेक भार्गव ज्यांना आम्ही प्रेमाने अबू म्हणायचो त्यांचे आज दुर्दैवी निधन झालं. फार लवकर त्याने हे जग सोडून जाण्याची घाई केली.त्याने अजून वयाची चाळिशीही ओलांडली नव्हती. पण या लहान वयातही त्याने बरेच काही साध्य केलं होते.तो एक यशस्वी उद्योजक होता. भारतीय जनता पार्टी मध्ये त्याने फार लवकर कामाला सुरुवात केली आणि आपल्या अंगभूत गुणांमुळे तो फार लवकरच प्रभाग क्रमांक 85 चा अध्यक्षही बनला होता.तिथेही त्याने खूप चांगली कामगिरी करून दाखवली होती. परागजींच्या निवडणुकीच्या काळात,ज्योतीवहिनींच्या निवडणुकीच्या काळात अभिषेकने खूपच भरीव कामगिरी केली होती. पार्ले महोत्सवाच्या अगदी सुरुवातीच्या काळातल्या काही मोजक्या कार्यकर्त्यांपैकी तो एक होता.गेले कित्येक वर्ष पार्ले महोत्सवाच्या नृत्यस्पर्धेचा प्रमुख म्हणूनही त्याने उत्तम कामगिरी बजावली होती.आपला मुद्दा (भलेही तो चुकीचा का असेना!! )पण रेटून तो कसा खरा आहे हे पटवण्यामध्ये त्याचा हात कोणीच पकडला नसता.माईक न घेताही मैदानाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाईल एवढा भारदस्त आवाज होता त्याचा.आज तो आपल्यात नाही ही कल्पना खरं तर अशक्य वाटते आहे पण हेच वास्तव आहे.अभिषेक मित्रा तुझ्या मृतात्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुझ्यासाठी "तुला भावपूर्ण श्रद्धांजली" हे शब्द लिहावे लागतील असा कधी वाटला नव्हते,, पण ती वेळ आमच्यावर आली आहे,याचं दुःख फार मोठे आहे....

No comments:

Post a Comment